महापालिकेच्या शहर सुशोभीकरणाला घाणीचे ग्रहण कोट्यावधी रुपयांची शिल्पे देखभालीअभावी काळवंडली

वसई |  प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिकेचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशा स्वरूपाचा बनला आहे. वसई विरार महापालिकेने कोट्यावधी रुपयांचा खर्च करून शहर सुशोभीकरणासाठी जो उपक्रम हाती घेतला होता; तो उपक्रमच आता घाणीच्या विळख्यात सापडला आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेले शिल्पे कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याने शहर सुशोभीकरणाचे अक्षरशः तीन तेरा […]

Continue Reading

कामणहून सुटणारी एसटी बस अचानक बंद! विद्यार्थ्यांची वसई एसटी महामंडळ कार्यालयाला धडक

कामणहून सुटणारी एसटी बस अचानक बंद! विद्यार्थ्यांची वसई एसटी महामंडळ कार्यालयाला धड विरार | प्रतिनिधी  : एसटी महामंडळाच्या धरसोड वृत्तीमुळे सकाळी साडेपाच वाजता कामणहून सुटणारी एसटी बस अचानक बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागले, पोमण, मोरी, कामण, कोल्ही, चिंचोटी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय झालेली होती. किंबहुना बसचा प्रवास कामणऐवजी नागले गावापासून सुरु करण्यात आला. त्यामुळे कॉलेज […]

Continue Reading

गेल्या ३० ते ४० तासांपासून महामार्ग जाम शाळकरी, चाकरमान्यांचे मोठेच हाल महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतुकीला फटका

गेल्या ३० ते ४० तासांपासून महामार्ग जाम शाळकरी, चाकरमान्यांचे मोठेच हाल महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतुकीला फटका वसई | प्रतिनिधी : गेल्या ३० ते ४० तासांपासून मुंबई अहमदाबाद महामार्ग जाम झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी व कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन करावा लागत आहेत. सतत वाहतुककोंडीच्या समस्येमुळे नागरिक मेटाकुटीस […]

Continue Reading

विरार कोमसाप शाखा अध्यक्षपदी अजीव पाटील!

विरार | प्रतिनिधी  : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विरार शाखा अध्यक्षपदी अजीव पाटील यांची एकमताने निवड झाली. कोमसापचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे यांच्या उपस्थितीत 2 ऑगस्ट 2025 रोजी निवड प्रक्रिया पार पडली होती. यात अजीव पाटील यांची एकमताने निवड झालेली आहे. समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय असलेले अजीव पाटील कोकण मराठी साहित्य परिषदेचे मान्यवर सदस्य आहेत. […]

Continue Reading

कल्याणमध्ये म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन महायुतीत वाद

कल्याणमध्ये म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन महायुतीत वाद शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा भाजपच्या माजी आमदारांवर प्रकरण चिघळविण्याचा केला आरोप तर शिवसेना आमदार बिल्डरची वकिली करतात का ? भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांचा आमदार भोईर प्रतिप्रश्न कल्याण | प्रतिनिधी : कल्याण पश्चिमेतील म्हाडा कॉलनीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि भाजपचे माजी आमदार यांच्यातील वाद आरोप […]

Continue Reading

शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार

शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार बीड (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध कीर्तनकार, जेष्ठ पत्रकार तथा संवेदनशील कवी ह. भ. प. श शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील आध्यात्मिक पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 3 ऑगस्ट रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी […]

Continue Reading

आयुक्तांचा प्रति चौरस फूट दर 20-25 रुपये! तर उपसंचालक नगररचना वाय. एस. रेड्डी यांचे 10 रुपये कमिशन

आयुक्तांचा प्रति चौरस फूट दर 20-25 रुपये! तर उपसंचालक नगररचना वाय. एस. रेड्डी यांचे 10 रुपये कमिशन  बेकायदेशीर बांधकामांना माजी आयुक्त जबाबदार! कमिशनवर चालले नगररचना विभागाचे कामकाज ईडी कार्यालयाकडून झाला भंडाफोड प्रतिनिधी | विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या अनेक बेकायदेशीर बांधकामांना माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि त्यांची टीम जबाबदार असल्याचा ठपका अंमलबजावणी संचालनालय […]

Continue Reading

बीफार्म आणि डीफार्म अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत सहसंचालकांमार्फत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आदेश

मुंबई, दि. ३० :- राज्यातील बी.फार्म आणि डी.फार्म अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक निकष एक महिन्याच्या आत पूर्ण करावेत, अन्यथा त्यांच्या पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंड) रोखण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक […]

Continue Reading

पर्यटन विशेषांकासाठी साहित्य पाठवा!

मुंबई| मुंबईतून प्रकाशित होणार्‍या जनसंवाद प्रकाशनच्या ‘शब्द संवाद’ या दिवाळी अंकाचे यंदा चौथे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांत शब्द संवाद दिवाळी अंकाला साहित्यिक तसेच वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शब्द संवाद दिवाळी अंकाची ओळख सातासमुद्रापार कॅनडा, सौदी अरेबिया, लंडन आदी ठिकाणी असलेले भारतीय तसेच मराठीजनांपर्यंत जावून पोहोचली आहे. ‘शब्द संवाद’ने यंदा पर्यटन हा विषय निवडला […]

Continue Reading

वृंदावन आणि हरिद्वार बासरीच्या गुरु-शिष्य परंपरेत ठाण्यातच – पं. हरिप्रसाद चौरसिया

ठाणे | प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहात झालेल्या तेराव्या ‘अर्पण’ बासरी संगीत महोत्सवात पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या पाद्यपूजनाचा भावपूर्ण सोहळा पार पडला. या प्रसंगी बोलताना पं. चौरसिया म्हणाले, “वृंदावन आणि हरिद्वार दुसरीकडे कुठे नाही. येथे असलेल्या शेकडो बासरी वादकांमध्ये गुरूप्रती असलेली भक्ती आणि निष्ठा हीच खरी भारतीय संगीत परंपरेची ओळख आहे.” याप्रसंगी […]

Continue Reading