खरं तरं या व्यक्तीच्या नावातंच गणेश आहे. गणरायाच्या आश्वासक, करुणामयी मूर्तीसमोर आपण अनेकदा नतमतस्तक होतो. पण, ही गुणांची देवता आहे. तिची केवळ पूजा करण्याऐवजी चांगला माणूस होण्यासाठी दुसऱयाने आपल्यासमोर ठेवलेल्या `आदर्शांची पूजा व्हायलाच हवी ना? आयुष्यात आपल्या भाळी समाधानाची रेषा कायम असावी, हसतमुख रहावं ही जीवन जगण्याची कला शिकवणारे प्रमोद हे माझे दैनिक `प्रहार’मधील जुने सहकारी व मित्र.
साधारण 2008च्या सुमारास या हसतमुख व्यक्तिमत्त्वाशी माझा परिचय झाला. तेव्हापासून या व्यक्तीच्या नावाप्रमाणे त्याच्या गुणविशेषांच्या प्रेमात पडण्यास मी भाग पडलो. कोणत्याच कामाला नाही म्हणायचं नाही. त्रासायचं नाही, कंटाळायचं नाही. अविरत काम. कुणावरही कधी राग व्यक्त करायचा असेल तर तोही प्रेमाने. असं म्हणतात, की `प्रेमाने जग जिंकता येते,’ पण माणसांच्या दुनियेत माणसानं माणसांवर प्रेम करणं कधी जमेलंच असं नाही. प्रमोद गणेशे यांच्यासारखी माणसे मात्र त्याला अपवाद ठरावी.
`संगणेशाय् नम्’:!… ही तपोसाधना ज्यांनी अथक मेहनतीच्या बळावर पूर्ण केली. असं संगणक क्रांतीतलं आघाडीचं नाव म्हणून प्रमोद गणेशे यांना आदराचं स्थान द्यायला हवं. 2005 साली रोजीरोटीच्या शोधात मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील एका छोटय़ाशा खेडेगावातून प्रमोद यांनी मुंबई गाठली.
संगणकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दररोज होणारे नवनवे बदल, सहजगत्या आत्मसात करणाऱया या तरुणाला मुंबईत पहिला ब्रेक मिळाला तो `डीएनए’ या इंग्रजी वृत्तपत्रात.
जिभेवर खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वावरणाऱया या तरुणाचा मित्रपरिवार आणि गोतावळा अल्पावधीतच वाढला. बापूजी आणि माताजी (आई आणि बाबा) यांच्यापासून साधी राहणी आणि उच्चविचारसरणी हा गुण हेरल्याचे तो सांगतो. संगणकीय क्षेत्रात कायम जागृत ठेवलेली चिकित्सक वृत्ती, नवे तंत्र आत्मसात करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी यामुळे हार्डवेअर, सॉफ्टवेअर अशा प्रत्येक क्षेत्रांत प्रमोद नावाच्या तरुणाने आपल्या कार्यकतृर्त्वाचा झेंडा रोवला. काम कोणतंही असो तुम्ही कामाबद्दल परफेक्शनिस्ट असायला हवं, हीच प्रमोद यांची जीवनातील विचारसरणी आहे. या विचारांना अनुसरूनच त्यांची वाटचाल सुरू असते.
मध्य प्रदेशातील लिटिल फ्लॉवर हायस्कूल (कॉन्व्हेंट) मध्ये प्रमोद यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. तेथे शिक्षण घेत असताना शिक्षकांनी व वडिलधाऱया माणसांनी सांगितलेले चांगले विचार तो आत्मसात करत गेला. शाळा, महाविद्यालय करत करिअरच्या एका वळणावर येऊन पोहोचलेल्या गणेश यांना त्यांनी केलेल्या गुणांच्या पुजेचाच पुढे लाभ झाला.
2000 साली हरियाणा पानिपत येथे देशातील सर्वात मोठा मिडिया ग्रुप असलेल्या `दैनिक भास्कर’मध्ये प्रमोदला नोकरी मिळाली. डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनअरिंग ही संगणकीय क्षेत्रातील पदवी ग्रहण केल्यानंतर की बोर्ड, माउस, पीसी आणि कॉम्प्युटर स्क्रीनच्या दुनियेत वावर वाढलेल्या प्रमोद यांनी `इच वन, टीच वन’ हा मंत्र जपला.
आपल्यातील ज्ञान आणि कौशल्याचा इतरांनाही फायदा व्हावा म्हणून त्यांनी अनेकांत दडलेल्या संगणकतज्ञाला पुढे आणले. त्यामुळे अनेक सहकारी आणि मित्रमंडळींत प्रमोद यांना आपोआपचं आदराचं स्थान मिळालं. `स्वत:च्या कामाशी आणि विचारांशी प्रामाणिक असलेल्या या माणसाने चांगले यश मिळाले म्हणून कधी डोक्यात हवा जाऊ दिलेली नाही. लहान, थोर, वरिष्ठ, कनिष्ठ कुणाशीही बोलण्यातील अदब न बदलणारा हा माणूस विरळाच म्हणावा लागेल. अदबशीर, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा हा माणूस त्यामुळचे सर्वांना आपलासा वाटतो.
वयाच्या 20 व्या वर्षी नोकरीला सुरुवात करून जगाला आत्मविश्वासाने सामोरे जाणाऱया या मराठी तरुणाने भोपाळ ते पानिपत असा प्रवास करत राजधानी मुंबई गाठली. `फिर कभी मुड के नही देखा’असे आत्मविश्वासाने सांगणाऱया प्रमोद यांना वरळी सी-फेसवर कटिंग चहाचा घोट गळय़ाखाली उतरवत अथांग सागराच्या डोळय़ात डोळे घालायला आवडते. `गरीबीचा बाऊ नाही आणि श्रीमंतीचा माज नाही’ हे जगण्याचे तत्त्व सांगणारे लोक खूप आहेत. पण, प्रत्यक्षात वागणुकीत उतरवणारे हे गुणगणेश अर्थात प्रमोद गणेशे अभावानेच सापडतात. आमच्या मित्रपरिवारात ते असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
– विनोद साळवी
]]>
आजघडीला स्मार्ट सिटी व स्मार्ट गावाचा लाख गाजावाजा सुरू असला तरी शहरे व शहरात राहणारेच स्मार्ट, हेच वास्तव आहे. आजघडीला आपली जन्मभूमी असलेलं गाव, तिथली माणसं आपल्याला दिसेनाशी व आठवेनाशी झाली आहेत. शहरातला माणूस चंद्रावर जाण्यासाठी सज्ज झाला असताना गावचा माणूस मात्र आजही डोंगर- माळरान धुंडाळत आहे. शहरातील विद्यार्थ्यांचा हाती इंटरनेटसंपन्न मोबाईल फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर, आयपॅड आदी आधुनिक साधने आली. मात्र गावखेड्यातील गरीब विद्यार्थी इच्छा असूनही शिक्षणापासून कोसो दूर आहेत.
दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवणारी उस्मानाबाद जिल्’ातील एक विद्यार्थिनी रोजंदारीवर काम करणाºया वडिलांच्या खांद्यावर आणखी किती शिक्षणाचा भार टाकायचा, या विवंचनेतून आत्महत्येचा मार्ग निवडते. गरीबी हेच तिच्या आत्महत्येचे कारण. अशा अनेक बातम्या दररोज समाजमनाला हादºयांवर हादरे देत आहेत.

गरीबी आणि हालाखीचं जीवन जगणाºया अशाच वंचित मुलांसाठी मला काय करता येईल? त्यांना आत्महत्येपासून कसं परावृत्त करता येईल? या विचाराने अस्वस्थ झालेला नागेश ओहळ हा तरुण आपल्या कमाईतला चार आणे हिस्सा गरीब वंचित मुलांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी लावून नवीन शैक्षणिक चळवळीचा धागा बनू पाहतो आहे. त्याची सुरुवात आपलं मुळगाव सोलापूर जि. करमाळा तालुका हिसरे गावापासून करून वंचितांसाठी समृद्ध शिक्षणाचा पाया रचण्यास त्याने सुरुवात केली आहे.
‘व्हाईट चेरी फाउंडेशन’द्वारे ‘मिशन आणि व्हिजन’डोळ्यापुढे ठेवून हिसरे जिल्हा परिषद शाळेतील आठ, करमाळा तालुका हिवरे गावातील पाच आणि कोळगाव येथील पाच अशा १८ गरीब मुलांना दत्तक घेवून त्यांचे पालकत्वही त्याने स्वीकारले आहे. शहरातील मुलांप्रमाणे माझ्या गावखेड्यांतील मुलांनाही फाडफाड इंग्रजी बोलता आले पाहिजे. ही मुलेही संगणक साक्षर झाली पाहिजेत. माझ्या गावातील जिल्हा परिषदेची शाळाही डिजिटल झाली पाहिजे, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा चंग त्याने मनाशी बांधला आहे.
‘पैशाने सर्वच मोठे होतात पण मनाचे मोठेपणं हेच खरे मोठेपण’, हा आई सुलोचना यांनी घालून दिलेला आदर्श वंचितांसाठी झपाटून काम करण्याची उभारी देत असल्याचे नागेश सांगतो.
१९९७ साली मिडियाशी ओळख झाल्यानंतर समाजातील चांगल्या, वाईट घडोमाडीचं प्रतिबिंब एक वृत्तछायाचित्रकार म्हणून कॅमेºयात कैद करू लागलो. यातूनच समाज एका वेगळ्या नजरेतून पाहण्याची दृष्टीही मिळाली. मुंबई शहरात मित्र व नातलगांसोबत हॉटेलिंग, खरेदीवर दिवसाला होणारा खर्च हा आपल्या गावखेड्यातील एका कुटुंबाचा महिन्याचाही खर्च नाही, हे जगण्याचं गणितही आपल्याला बरचं काही शिकवून गेल्याचं नागेश सांगतो. कामगार आणि कष्टकºयांची वस्ती असलेल्या वरळी विभागतच लहानाचा मोठा झाल्याने गरीबी व दु:ख जवळून पाहिले.‘आपल्या मुलाने असं काही करावं की ज्यानं त्याचं व गावाचंही नाव मोठं होईल’, हा वडिलांनी मनावर बिंबवलेला विचार वंचितांसाठी संघर्षाला बळ देत आहे. आपल्या गावी आठ-दहा लाखाचं मंदिर उभारून स्वत:चं व कुटुंबाचं नाव चमकावण्यापेक्षा ज्ञानमंदिरातून माणसांतील देव जागा करण्याचे मिशनच मला महत्त्चाचे वाटते, ही नागेशची तळमळ त्याच्या डिजिटल शिक्षण चळवळीला उभारी देत आहे.
‘मायमराठी’चं कवतिक आपल्या प्रत्येकाच्या तोंडी असलं तरी मुंबई महापालिकेच्या मराठी शाळा व गावखेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा आजला एकामागोमाग एक बंद होत आहेत. आपल्या अनेक पिढ्या याच शाळांत शिक्षणाचे बाळकडू पिऊन मोठा झाला. पण, आता या शाळेचे नाव काढताच नाके मुरडली जात आहेत. नागेशसारखा तरुण हे चित्र बदलण्यासाठी आपल्या गावखेड्यातील जिल्हा परिषदेची शाळा आधुनिक व समृद्ध करण्यासाठी झटत आहे. सोलापूर जिल्हा परिषद, हिसरे गावात नोव्हेंबर २०१६ पर्यंत पहिली ते सातवीपर्यंत डिजिटल शाळा करणारच, हे लक्ष्य त्याने डोळ्यांपुढे ठेवले आहे. शहरातील मुलांप्रमाणे गावखेड्यातील मुलेही शिक्षणाच्या नव्या प्रवाहात कुठेच कमी पडू नयेत. त्यांच्यातही जग जिंकण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, हाच आपला एकमेव स्वार्थ यामागे असल्याचे तो सांगतो. ‘आज तु एकाला मदत केलीस तर उद्या तो दुसºयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील’, ही भावना प्रत्येकांच्या मनात वाढीस लागल्यास वंचितांसाठी शिक्षण चळवळीचा हा वटवृक्ष नक्कीचं बहरेल, हा विश्वासच नागेशच्या डिजिटल शिक्षण क्रांतीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहे.
फळाफुलांचा मळा पाहिजे,
आनंदाचा सोहळा पाहिजे,
गावात एकवेळ देऊळ नसेल तरी चालेल
पण एक आदर्श शाळा पाहिजे!
संपर्क नागेश ओहळ : ८४४६८१९१९९
लेखक : विनोद साळवी
]]>