Uname:Linux ip-208-109-10-167.ip.secureserver.net 3.10.0-1160.144.1.el7.tuxcare.els8.x86_64 #1 SMP Sun Jul 5 17:25:39 UTC 2026 x86_64

ठाणे – Aaple Kokan https://www.aaplekokan.com About kokan, For kokan and for people who love and adore kokan... Mon, 20 Oct 2025 07:22:43 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=7.0.4 “सायकलवरून आला प्रकाश — बेघरांच्या चेहऱ्यावर झळकली खरी दिवाळी” https://www.aaplekokan.com/2025/10/20/prakash-came-from-a-bicycle-real-diwali-shined-on-the-faces-of-the-homeless/ https://www.aaplekokan.com/2025/10/20/prakash-came-from-a-bicycle-real-diwali-shined-on-the-faces-of-the-homeless/#respond Mon, 20 Oct 2025 07:22:43 +0000 https://www.aaplekokan.com/?p=336 सायकलवरून आला प्रकाश — बेघरांच्या चेहऱ्यावर झळकली खरी दिवाळी”

ठाणे : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि माणुसकीचा उत्सव — आणि ठाण्यातील सायकल प्रेमी फाउंडेशन (ACPF) ने यंदा तो अर्थ अधिक सुंदरपणे उजळवला.
संस्थेने “इको-फ्रेंडली दिवाळी सायकल राईड” आयोजित करून ठाणे महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांसोबत फराळ, मिठाई आणि संवादाच्या माध्यमातून दिवाळी साजरी केली.

या वेळी सायकलिस्ट प्रिया कांबळे हिने सायकलवर आधारित रांगोळी साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निवारा केंद्रातील रहिवाशांनी आलेल्या सायकल प्रेमींची ओवाळणी करून स्वागत केले.भावनांनी भरलेल्या क्षणांत एक लाभार्थी म्हणाला, “मन भरून आलं… इतक्या वर्षांनी असं वाटलं की कोणीतरी आपल्यासाठी आलं आहे. ही दिवाळी आमच्यासाठी खरंच खास ठरली.” केंद्राचे व्यवस्थापक मनीष वाघमारे म्हणाले, > “या केंद्रातील अनेकजण जीवनातील संघर्षांमुळे समाजापासून दूर गेलेले आहेत.अशा कार्यक्रमांमुळे त्यांना आत्मविश्वास आणि माणुसकीचा हात मिळतो.”

या वेळी “दुर्गे दुर्घट भारी – नवरात्र सायकल चॅलेंज 2025” चा निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षक तुषार डोके यांचा सत्कार करण्यात आला, तर संस्थेतील रणरागिणी प्रिया कांबळे हिला “नवदुर्गा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष प्रज्ञा मात्रे म्हणाल्या की, “या केंद्रातील अनेक लाभार्थी जीवनातील संघर्षांमुळे समाजापासून दुरावलेले आहेत.
अशा कार्यक्रमांमुळे त्यांना आत्मविश्वास आणि माणुसकीचा हात मिळतो.”

🏆 निकाल संक्षेप:

हौशी गट (Men): ऋषिराज टिल्लू, प्रकाश जिझस, प्रदीपकुमार सोलंकर
हौशी गट (Women): शीतल देवळकर, लता रविचंदर, प्रिया कांबळे
प्रोफेशनल गट (Men): रवी यादव, प्रशांत कावळे, प्रविण सागरे
प्रोफेशनल गट (Women): वैशाली पवार, जयश्री कुदळे, डॉ. वैशाली दोंडे

सायकलिस्ट सतीश जाधव म्हणाले > “दरवाजातून आत येताना ओवाळणी झाली, तेव्हा आईची आठवण झाली.
सामाजिक समरसतेची जाणीव मनात ठेवणं — हीच खरी दिवाळी आहे.”
सुवर्णा अडसुळे, दुर्गा गोरे, नरेश मालुसकर, कुंदा शिरसाट यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाला अर्थपूर्ण बनवणारी ठरली.

]]>
https://www.aaplekokan.com/2025/10/20/prakash-came-from-a-bicycle-real-diwali-shined-on-the-faces-of-the-homeless/feed/ 0
पोलादपूर महाबळेश्वर मार्गवरील वाहतूक पूर्ववत महिनाभर बंद असलेली वाहतूक सुरू झाल्याने प्रवासी वर्गात समाधान https://www.aaplekokan.com/2025/08/25/due-to-the-closure-of-pol-mahabaleshwar-route-for-a-month-the-passengers-are-financially-satisfied/ https://www.aaplekokan.com/2025/08/25/due-to-the-closure-of-pol-mahabaleshwar-route-for-a-month-the-passengers-are-financially-satisfied/#respond Mon, 25 Aug 2025 13:44:29 +0000 https://www.aaplekokan.com/?p=241 पोल महाबळेश्वर मार्गावरील पूर्ववत महिनाभर बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या प्रवासी वर्गात समाधान

महाड – वाह : – नैसर्गिक आपत्ती घाट मार्गी मार्गी गडगडाग़्हा स्वतंत्रपणे खुले आदेश दिले आहेत. या मार्गाने महिनाभरात एसटी व्हीजीटी व्ही सह बंद विक्री पूर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी जाहीर समाधान व्यक्त केले जात आहे.

महाडचे प्रांताधिकारी यांनी कार्यान्वित अभियंता, (कोकण) महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ मुंबई पोलाद महाबळेश्वर राज्य मार्ग (अंबेनळी घाटा) सुविधा व मजबुत काम पार्केथवर स्थानिकीकरण अडगळे हटवणे, ढिगारा साफ करणे आणि सुरक्षित करणे हे त्यांच्यासाठी सुरक्षित आहे. पूर्ण करणे आवश्यक आहे.

एकाच वेळी पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. संपूर्ण करणे पूर्ववत सुरू स्थिती सूचना संबंधित विभागांना दिले महाबळ वाय पाचारा सात तालेश्वर या मार्गाने जाणारे मार्ग मार्ग आवेनळी घाटातून दूर जात एक महिना सुरक्षित कारणास्तव शांतता थांबला होता कारण घाटात सर्व काही पूर्ण झाले. आत्ताच सुरू आहे.

पोलादपूर संपूर्ण कापडे , आटा , चिरेखिंड , वाडा कुंभशी इतर गावांप्रमाणे या पायरो प्रवासी वर्गाला योग्य आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरून जाण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर पुणे , महाड अक्कलकोट , रोहा , रोहा तुळजापूर , रोहाली , श्रीवर्धन मिरज , सातारा सह पाचणी मुंबई , महाबळेश्वर मुंबई आदी प्रवासी बसेस मित्र वाहने या मार्गावरून सुरू आहे. व्यवसायाला दिलासा दिला आहे.

]]>
https://www.aaplekokan.com/2025/08/25/due-to-the-closure-of-pol-mahabaleshwar-route-for-a-month-the-passengers-are-financially-satisfied/feed/ 0
दिव्यात शिवसेना उपशहरप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.आमदार राजेश मोरे यांनी देखील केले रक्तदान. https://www.aaplekokan.com/2025/08/17/a-grand-blood-donation-camp-was-held-on-the-occasion-of-the-birthday-of-shiv-sena-sub-city-chief-in-divyat-mp-rajesh-more-also-donated-blood/ https://www.aaplekokan.com/2025/08/17/a-grand-blood-donation-camp-was-held-on-the-occasion-of-the-birthday-of-shiv-sena-sub-city-chief-in-divyat-mp-rajesh-more-also-donated-blood/#respond Sun, 17 Aug 2025 14:05:21 +0000 https://www.aaplekokan.com/?p=226

दिव्यात शिवसेना उपशहरप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.आमदार राजेश मोरे यांनी देखील केले रक्तदान.

संतोष पडवळ –  ठाणे ता १७ ऑगस्ट : शिवसेना दिवा उपशहर प्रमुख व मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार १७ ऑगस्ट रोजी दिवा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवक कैलेश पाटील यांच्या आयोजनाने दरवर्षी शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. येत्या २० ऑगस्ट रोजी कार्यसम्राट नगरसेवक शैलेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

रक्तदान हेच श्रेष्ठदान असून या सामाजिक भावनेतून शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन समाजसेवक कैलास मनोहर पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिर दिव्यातील रिलायन्स टॉवर, शिवसेना शाखा दिवा येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांची विशेष उपस्थिती लाभली प्रसंगी आयोजित शिबिरामध्ये आमदार मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः ही रक्तदान केले व रक्तदान हेच सर्व श्रेष्ठदान असून दिवा शहरातील नागरिकांनी रक्तदान करण्याचे देखील आवाहन केले.

सदर शिबिरासाठी ब्लड लाईन आणि चॅरिटेबल ब्लड बँक, ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले तर हरदेव हॉस्पिटलचे संचालक शेखर देशमुख हे देखील उपस्थित होते. सदर शिबिरात १५७ जणांनी रक्तदान केले तर सर्व रक्तदात्यांचा मा. नगरसेवक शैलेश पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवारांनी सत्कार व अभिनंदन केले. प्रसंगी मा. उपमहापौर रमाकांत मढवी, आदेश भगत यांच्यासह दिवा शिवसेनेचे विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, विभाग अध्यक्ष – उपाध्यक्ष उपस्थित होते. तसेच स्थानिक शाखेचे प्रदीप पाटील, भरत मोहिते, किरण जाधव, सुरेश जगताप, जगदीश कदम, माऊली मोहिते, संतोष तांबे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

]]>
https://www.aaplekokan.com/2025/08/17/a-grand-blood-donation-camp-was-held-on-the-occasion-of-the-birthday-of-shiv-sena-sub-city-chief-in-divyat-mp-rajesh-more-also-donated-blood/feed/ 0
‘माझं संविधान, माझा स्वाभिमान’ – संविधान स्विकारलेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा गौरव व स्पर्धेचे उद्घाटन. https://www.aaplekokan.com/2025/06/30/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%82-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ad/ https://www.aaplekokan.com/2025/06/30/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%82-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ad/#respond Mon, 30 Jun 2025 13:19:33 +0000 https://www.aaplekokan.com/?p=51 ठाणे | प्रतिनिधी :- भारताच्या संविधान स्वीकारल्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक औचित्याने ‘AGNI’ (Active Governance National Initiative) तर्फे ‘माझं संविधान, माझा स्वाभिमान’ या शीर्षकाखाली एक विशेष जनजागृती अभियानाची सुरुवात आज राज्यभर करण्यात आली.या  अभियानाचा उद्देश तरुणाईसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संविधानातील मूल्यांची जाणीव, अभिमान आणि सक्रिय नागरिकत्वाची भावना निर्माण करणे हा आहे.

ठाणे येथील टाउन हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, कोर्टनाका (पश्चिम) येथे या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘AGNI’चे संचालक श्री. निखिल पोहेकर यांनी केले. त्यांनी या अभियानामागील उद्दिष्टे स्पष्ट करत संविधानाचा सर्वांगीण अभ्यास का गरजेचा आहे, हे अधोरेखित केले.

 

स्पर्धेविषयी माहिती देताना सांगितले की agniindia.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्या ठिकाणी संविधान विषयक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सुंदर, सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे. ते ऐकायचं आहे व त्यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवायची आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतिचिन्हे मिळणार आहेत.

या उपक्रमाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दैनिक महाराष्ट्र सम्राटचे संपादक श्री. गणेश भोईटे, दैनिक सम्राट चे कार्यकारी संपादक श्री. कुणाल कांबळे, तसेच इतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ. मधुरा वेलणकर-साटम. त्यांनी संविधान आज वाचणे का गरजेचे आहे, यावर मार्मिक भाष्य करत सांगितले की, “नागरिक म्हणून आपल्याला संपन्न आणि सजग बनवण्यासाठी संविधानाचे नीट वाचन आणि समज आवश्यक आहे.”
या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी www.agniindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

]]>
https://www.aaplekokan.com/2025/06/30/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%82-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ad/feed/ 0
केंद्राचा ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम` चितेवर! https://www.aaplekokan.com/2025/02/20/%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%a6/ https://www.aaplekokan.com/2025/02/20/%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%a6/#respond Thu, 20 Feb 2025 17:00:51 +0000 https://www.aaplekokan.com/?p=42 पर्यावरण रक्षणाऐवजी महापालिकेकडून 2 कोटी 40 लाखांची जळाऊ लाकूड खरेदी

गॅस शवदाहिनीवरील दीड कोटीचा खर्च हवेत

प्रदूषण टाळण्यासाठी विराट नगर येथील स्मशानभूमीत दीड कोटीची चिमणी

प्रतिनिधी

विरार : सन 2024-25 या वर्षात महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमींत शव दहनासाठी जळाऊ लाकडांचा पुरवठा करण्याकरता वसई-विरार महापालिकेने 2 कोटी 40 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या माध्यमातून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी विरार-विराट नगर येथील स्मशानभूमीत दीड कोटी रुपये खर्च करून वायुउत्सर्जन चिमणी बसविण्याचाही निर्णय घेतलेला आहे. मागील पाच वर्षांत पालिकेने जळाऊ लाकडांवर अंदाजे 10 कोटी रुपये खर्च करून ‘केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमा`ला चितेवर चढवले आहे.

वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत एकूण 88 स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमींत प्रेत दहनाकरता जळाऊ लाकडे महापालिकेमार्फत मोफत पुरवण्यात येतात. मार्च 2023 पर्यंत प्रेतदहनाकरता 3109 टन 695 किलोग्रॅम जळाऊ लाकडांचा वापर झालेला आहे. एप्रिल 2022 ते मार्च 2023 अखेरपर्यंत एकूण 8801 शव दहन करण्यात आली असल्याचे पालिकेने म्हटले आहे. तर मार्च 2024 पर्यंत 4083 टन 575 किलो जळाऊ लाकडांचा पुरवठा झालेला आहे. या माध्यमातून एप्रिल 2023 ते मार्च 2024 अखेरपर्यंत एकूण 8742 शव दहन करण्यात आलेली आहेत. सन 2019 ते 2024 पर्यंत वसई-विरार महापालिकेने 8 कोटी 67 लाख 87 हजार 683 इतका खर्च केवळ जळाऊ लाकडांवर केलेला आहे.

दरम्यान; कोविड संक्रमण काळात वाढलेली मृत्यूंची संख्या; शिवाय मृतदेह जाळताना होणारे प्रदूषण रोखणे, वृक्षांचे संवर्धन व संरक्षण होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमां`तर्गत पालिकेने शहरातील स्मशानभूमींत गॅसशवदाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत पालिकेला प्राप्त झालेल्या 32 कोटीच्या निधीतून आचाळेसह पाचूबंदर, नवघर, समेळपाडा आणि विरार स्मशानभूमींत गॅसशवदाहिनी बसवण्यात आलेली होती. त्यासाठी प्रति गॅस शवदाहिनी 32,97,510 इतकी रक्कम निश्चित करण्यात आली होती. चार स्मशानभूमींतील गॅस शवदाहिनीकरता पालिकेने तब्बल 1 कोटी 31 लाख 90 हजार 040 रुपये खर्च केलेले आहेत.

प्रत्यक्षात; या गॅस शवदाहिनींचा वापर होण्याऐवजी जळाऊ लाकडांचा वापर वाढत असल्याचे निरीक्षण आहे. शिवाय केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी संकल्प असलेल्या ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमा`ची पूर्ती होण्याऐवजी भ्रष्टाचार वाढीस उत्तेजन मिळत असल्याचे वसई-विरारकरांचे म्हणणे आहे. त्यात स्मशानभूमींत होणारे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने विरार-विराट नगर येथील स्मशानभूमीत तब्बल दीड कोटी रुपये खर्चून वायुउत्सर्जन चिमणी बसविण्याचाही निर्णय घेतलेला असल्याने पालिकेच्या या निर्णयाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
*

मागील पाच वर्षांत जळाऊ लाकडांवर झालेला खर्च!

सन खर्च
2019-20     1,95,44,127
2020-21         1,76,07,609
2021-22        1,68,66,770
2022-23        1,36,12,755
2023-24        1,91,56,422

]]>
https://www.aaplekokan.com/2025/02/20/%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%a6/feed/ 0
विधानसभा निवडणुकीत भाजप बविआला मदत करणार? https://www.aaplekokan.com/2024/09/21/will-bjp-help-bavia-in-assembly-elections/ https://www.aaplekokan.com/2024/09/21/will-bjp-help-bavia-in-assembly-elections/#respond Sat, 21 Sep 2024 17:30:04 +0000 https://www.aaplekokan.com/?p=21

  • संजय राणे

    आगामी विधानसभा निवडणुकांचं बिगुल कधीही वाजेल, अशी शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वसईत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याच निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन वसईतील स्थानिक बहुजन विकास आघाडी हा पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते कामाला लागले आहेत. याच कामांचा भाग म्हणून नुकतेच विरार-चिखलडोंगरी येथील महावितरणच्या विद्युत केंद्राचं भूमिपूजन वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नालासोपाराचे युवा आमदार अर्थात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते झालं. अर्थात; आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विशेष वक्तव्यामुळे हे भूमिपूजन वैशिष्टपूर्ण आणि वसई-विरारकरांचं लक्ष वेधणार ठरलं आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या भूमिपूजनाच्या सरतेशेवटी जाणीवपूर्वक; किंबहुना सर्वांना माहीत असावं, या उद्देशातून या विद्युत केंद्राकरता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचं मौलिक योगदान लाभल्याची जाहीर वाच्यता केली. वसईच्या राजकीय वर्तुळात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेलं हे वक्तव्य आत्यंतिक महत्त्वाचं मानलं जात आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांचं हे वक्तव्य आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला दिशा देणारं असेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात आहे.

    2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने वसई, नालासोपारा आणि बोईसर हे तीन मतदारसंघ बहुजन विकास आघाडीविरोधात लढवले होते. पण निवडणुकीत भाजप व शिवसेना युतीतील शीतयुद्ध बहुजन विकास आघाडीच्या पथ्यावर पडलं होतं. भाजपने शिवसेनेच्या जागा कमी करण्याच्या राजकीय हेतूतून या तीनही मतदारसंघांत बहुजन विकास आघाडीला ताकद दिली होती. कारण या तीनही जागा भविष्यात भाजपच्या जागा वाढल्यास सत्तेसोबत येतील, अशी आशा भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना होती. बहुजन विकास आघाडीचा इतिहासही आपला प्रदेश सांभाळताना सत्तेसोबत जाण्याचा राहिला आहे. त्या वेळच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतल्यास भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी शक्यता होती. त्यामुळे बहुजन विकास आघाडीनेही भाजपला आधीच जाऊन समर्थन दिलं होतं. त्या पश्चात महाविकास आघाडीचा सरकार स्थापन झाले व हितेंद्र ठाकूर यांनी व्हाया शरद पवार अशोक चव्हाण यांची भेट घेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. पुढे शिवसेनेचा पक्ष फोडून महायुतीचे सरकार स्थापन झाले व बहुजन विकास आघाडीने पुन्हा महायुतीस पाठिंबा देऊन आपली सत्तेसोबत राहण्याची परंपरा कायम राखली. या राजकीय साठमारीत शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळालं आणि भाजप आणि बहुजन विकास आघाडी असे दोघंही तोंडावर पडले. शिवसेनेसोबत खेळलेल्या या राजकीय कुटील डावात भाजप व बहुजन विकास आघाडीतील प्रेम लपून राहिलं नाही. नंतरच्या काळात विविध निवडणुकांनिमित्ताने भाजपच्या अनेक नेत्यांनी विरार येथील विवा कॉलेजच्या उंबरठ््यावर पायधूळ झाडली. डोकं रगडलं. यातून भाजप व बहुजन विकास आघाडीतील सख्य अधिकाधिक अधोरेखित झालं. परंतु भाजप सोबतच्या या सलगीने बहुजन विकास आघाडीचा पारंपरिक मतदार काही प्रमाणात दुरावला.

    तीन आमदार असूनही बहुजन विकास आघाडीला राजकीय ‘बार्गेनिंग पॉवर` कधीच दाखवता आली नाही. उलट त्यांचा वापरच जास्त झाला. याचे थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतही दिसून आले. या निवडणुकीत भाजप किंवा शिवसेना बहुजन विकास आघाडीसोबत उमेदवार देण्यावरून वाटाघाटी करेल, अशी शक्यता होती. परंतु शिवसेनेने त्यांना अजिबात धूप दाखवला नाही. कारण 2019 मधील निवडणुकीत बहुजन विकास आघाडी हा भाजपपेक्षा शिवसेनेचा थेट विरोधक होता. शिवाय देशातील व राज्यातील सत्तापालट लक्षात घेता बहुजन विकास आघाडी शिंदे व फडणवीस यांच्यासोबतच जाईल, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नव्हती. याची झलक मागील वर्षी विवा कॉलेजमधील ‘साहित्य संमेलना`च्या निमित्ताने सर्वांनी पाहिलीच होती. 2019 च्या निवडणुकीत बविआला ‘राजकीय पॉवर` दाखवलेल्या एकनाथ शिंदे यांनी या वेळी मात्र आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या गळ्यात स्तुतिसुमनांचे हार घातले. त्याही आधी त्यांनी ‘आप्पा; शिकायत का मौका नही दुंगा` म्हणत आमदार हितेंद्र ठाकूर यांना सरेंडर झाले होते.

    दरम्यानच्या काळात भाजपने बहुजन विकास आघाडीचा आपल्या सोयीसाठीच अधिक वापर केला, हेही वेळोवेळी दिसून आलं. बहुजन विकास आघाडीला भाजपकडून लोकसभा निवडणुकीतही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या निवडणुकीत भाजपने ही जागा बहुजन विकास आघाडीला सोडावी, अशी अप्रत्यक्ष इच्छा बहुजन विकास आघाडीची होती. सरतेशेवटी वाट पाहून कुंथलेल्या बहुजन विकास आघाडीने बोईसरचे आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. पण त्यांना भाजपच्या ताकदीपुढे सर्वशक्तीनिशी लढता आलं नाही. किंबहुना त्या पद्धतीने लढण्यासाठी त्यांनी उमेदवार दिलाच नव्हता. उलट भाजपने मतविभाजनासाठी (ख्रिस्ती व मुस्लिम ) बहुजन विकास आघाडीचा वापर करून घेतला. बहुजन विकास आघाडी या मतदारसंघांतील आपलं ख्रिस्ती व मुस्लिम मताधिक्क्य कायम ठेवू शकली, तर भाजपचा विजय सुकर होणार होता. पण या दोघांची कुटील नीती मुस्लिम व ख्रिस्ती मतदारांच्या नजरेतून सुटली नाही. अपेक्षेप्रमाणे यातील बहुतांश मतं शिवसेनेच्या पदरात पडली. बहुजन विकास आघाडी किमान दुसऱ्या स्थानाला येईल, अशी आशा त्यांच्या नेत्यांना होती. पण तसं मुळीच झालं नाही. त्यांना त्यांची मतंही सांभाळता आली नाही. अर्थात, अपेक्षेप्रमाणे बहुजन विकास आघाडीने भाजपच्या विजयास हातभार लावला तरी त्यांचं घटलेलं मताधिक्क्य त्यांची आमदारकीची खुर्ची हलवणारं होतं.

    ही भरपाई करण्याच्या दृष्टीनेच आता बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे नेते पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नुकतीच ख्रिती मतदारांना माऊंट मेरीची ट्रिप घडवून आणली आहे. मुस्लिम मतदारांना चुचकारण्यासाठी त्यांनी त्यांच्या जुलूसमध्येही सहभाग नोंदवलेला आहे. अनेक छोट्या-मोठ्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग जाणीवपूर्वक दिसतो आहे. एरव्ही कुठेही न दिसणारे युवा आमदार क्षितिज ठाकूरही दहीहंडीनंतर अनेक कार्यक्रमांत दिसून आलेले आहेत. अर्थात; आमदार द्वयींची सक्रियता निवडणुका उंबरठ्यावर आल्याची नांदी आहे.

    पण विद्युत केंद्राच्या भूमिपूजनादरम्यान आमदार हितेंद्र ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा केलेला उल्लेख अधिक अधोरेखित करण्यासारखा आहे. कारण बहुजन विकास आघाडीने लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपसाठी बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचा बळी दिलेला आहे. त्याची पुण्याई म्हणून भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत वसई आणि नालासोपारा हे दोन विधानसभा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीसाठी सोडेल, अशी शक्यता आहे. कदाचित बोईसरच्या जागेवर वाटाघाटी होतील. यात राजेश पाटील यांचीच पुन्हा एकदा आहुती दिली जाईल. हा निर्णय सर्वस्वी देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात आहे. पण बहुजन विकास आघाडीच्या पिता-पुत्रांचा विजय सुकर होण्याच्या दृष्टीने रणनीती ठरले, यात नवल नाही. तोपर्यंत बहुजन विकास आघाडीलाही ‘फडणवीस`पूजेशिवाय पर्याय नाही. विद्युत केंद्राच्या भूमिपूजनादरम्यान आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा वाढवलेला नारळ त्याचाच भाग मानला जात आहे.

]]>
https://www.aaplekokan.com/2024/09/21/will-bjp-help-bavia-in-assembly-elections/feed/ 0